Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेआळंदीत प्रभाग रचना हरकतीसाठी नागरिकांना आवाहन

आळंदीत प्रभाग रचना हरकतीसाठी नागरिकांना आवाहन

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनादेशा प्रमाणे प्रभाग रचना तयार करून नागरिकांच्या सूचना हरकती साठी जाहीर करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना हरकती सूचनां द्यायच्या आहेत त्यांनी १० ते १४ मे २०२२ या कालावधीत विहित वेळेत आणि मुदतीत हरकती सूचना दाखल करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाने राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनां प्रमाणे आळंदीत आळंदी नगरपरिषदेने नागरिकांच्या सूचना हरकती साठी प्रभाग रचना जाहीर केली आहे. १० मार्च २०२२ ला सुरु असलेल्या टप्प्यांपासून निवडणूकांची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्या प्रमाणे आळंदीत प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकती पासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनादेशाने आळंदी नगरपरिषदेने प्रारूप प्रभाग रचना नागरिकांच्या अवलोकनासाठी जाहीर केली आहे.
यात १० ते १४ मे २०२२ या कालावधीत प्रारूप प्रभागरचनेवर नागरिकांनी हरकती व सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दाखल हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी २३ मे रोजी सुनावणी घेणार असून त्यावर अभिप्राय नोंदवून तो अहवाल ३० मे २०२२ ला विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. संबंधित विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेस ६ जुन पर्यंत मान्यता देतील अशी शक्यता आहे.
आळंदीतील प्रभाग रचना पाहण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली असून नागरिकांमध्ये प्रारूप प्रभाग रचना पाहण्याची उत्सुकता रचना जाहीर झाल्याने संपली आहे. आळंदीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहन कुऱ्हाडे, सतीशबापू कुऱ्हाडे, अक्षय रंधवे, सौरभ गव्हाणे, अमित कुऱ्हाडे, प्रसन्न बोराटे, शुभम जाधव, निखिल बनसोडे, संकेत पाटील आदींनी नगरपरिषदेत जाऊन प्रसिद्ध केलेली प्रभाग रचना पाहत समाधान व्यक्त केले आहे. लोकांनी प्रभाग रचना पाहून हरकत सूचना कालावधीत आपल्या हरकती नोंदवाव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!