राष्ट्रीय कुटुंब योजनेतील लाभ लाभर्थ्यांना त्वरित देण्यासाठी तहसिलदाराना शिवसेनेतर्फे निवेदन

806

शैलेंन्द्र चौधरी नंदुरबार

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या18 ते 59 वयोगटातील(60 वर्षापेक्षा कमी)कुटुंब प्रमुख स्त्री /पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबियांना15 दिवस ते 1 महिन्याच्या आत एक रकमी रु. 20,000/- एवढे अर्थ सहाय्य देण्याची तरतूद आहे त्यानुसार सदर लाभ कुटुंबातील व्यक्ति मृत पावल्यास शक्यतो15 दिवसांच्या आत देण्यात यावा. या करिता ग्राम स्तरावर सरपंच, ग्रामसेवक,आशा वर्कर, अंगणवाड़ी सेविका,तलाठी इ. घटकानी समन्वयाने काम करावे बाबत शासन निर्णय क्रमांक राकुला – 2012 / प्रक- 277 / विसयो – 2 दिनांक 12 मार्च 2013 रोजी पारीत असताना देखील वरील संबंधीत घटक या योजनेची अंमलबजावणी तर करत नाही पण सामाजिक घटकांकडून तयार प्रकरणे देखील वर्ष,सहामहिने रेंगाळत राहतात सदरची प्रकरणे रेंगाळत राहु नये म्हणून शासन निर्णय संदर्भ क्रमांक 3 मधे सुधारणा करुन असे नमूद केले आहे की, यापूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समितिला ही प्रकरणे मंजूर करण्याचा अधिकार होता मात्र ही केंद्र शासनाची योजना आहे या योजनेत15 दिवसांत लाभ द्यावयचा आहे किंबहुना या योजनेची अंमलबजावणी राज्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे या बाबी लक्षात घेऊन या योजने मधे अर्थ सहाय्य मंजुरीचे काम पहणाऱ्या तहसीलदार यांना देण्यात आलेले असताना देखील वर्ष- सहा महीने सदरची प्रकरणे रेंगाळत राहणे ही खेदाची बाब तर आहे पण शासनाच्या निर्णयाचे देखील उलंघन करणारी आहे म्हणून तात्काळ संबंधित लाभार्थिना या योजनेचा लाभ मिळावा शासन निर्णयात नमूद18 ते 59 वयोगटातील (60 वर्षापेक्षा कमी)असलेल्या कर्ता स्त्री/पुरुष यांना लाभ द्यावा असे असतांना 59 वर्षे 7 महीने वयातील लाभार्थ्यांना सदर योजनेच्या लाभापासुन वंचित ठेवण्यात येते जर शासनाच्या नेमलेल्या अधिकाऱ्यांना शासनाने लिहिलेल्या शासन निर्णय समजत नसेल तर यापेक्षा दुःखाची गोष्ट कोणती?की सर्व बाबींची माहिती असतांना जानिवपूर्वक श्रीमती रेखा वसंत मुडावडकर व श्रीमती कल्पनाबाई नामदेव पाटिल , दोन्ही रा.मु.पो.जूनी महादेव गल्ली नवापुर ता.नवापुर जि. नंदुरबार या वंचित कुटुंबाला या योजनेपासुन लांब ठेवले या बाबत खुलासा व्हावा व संबंधित कुटुंबाला त्यांचा न्याय हक्काचा लाभ मिळावा अन्यथा शिवसेना मोठे जन आंदोलन करेल याची दखल घ्यावी यामुळे कायदा व सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहिल याची कृपया नोंद घ्यावी . निवेदनावर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख गणेश वडनेरे लाभार्थी श्रीमती कल्पनाबाई नामदेव पाटिल,श्रीमती रेखाबाई वसंत मुडावडकर,अक्षय वसंत मुडावडकर प्रकाश नामदेव पाटिल यांच्या सह्या आहेत.