शिधावाटप दुकानात जीवनाश्यक वस्तुचा तुटवडा

813

मुंबई प्रतिनिधी,

मुंबईतील सर्व शिधावाटप दुकानात फक्त गहू उपलब्ध आहे. तांदूळ, पामतेल, साखर आणि डाळ केव्हा उपलब्ध होईल? असा सवाल आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन आहे. आज शिधावाटप दुकानात गहू उपलब्ध आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. अधिकारी खाजगीत सांगत आहेत की धान्य उचल करणारी यंत्रणा नसल्यामुळे सरकारी अधिकारी हतबल आहेत. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांसकडे मागणी केली आहे की शिधावाटप दुकानात जीवनाश्यक वस्तुचा तुटवडा असून तो दूर करावा आणि सामान्यांना जीवनाश्यक वस्तुंचे वितरण केले.