पाकिस्तानचे भारतापुढे लोटांगण; चर्चेची मागणी

1345

मल्हार न्यूज ,नवी दिल्ली

भारताने केलेल्या वायू सर्जीकल स्ट्राईक२ ने पाकिस्तान पूर्णपणे घाबरला असून तसेच अमिरीकेने भारताला दहशतवादी विरोधी कारवाईला पूर्णपणे पाठींबा यामुळे पाकिस्तान पूर्णपणे घाबरला असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या देशाला संबोधित करताना यापुढे भारत पाकिस्तान  चर्चेतून मार्ग निघू शकतो असे ते म्हणाले. त्यामुळे पाकिस्तानने भारतापुढे चक्क लोटांगण घेऊन  नांगी टाकली आहे, असेच म्हणावे लागेल.

भारताच्या अफाट सैन्यदलापुढे आपला निभाव लागणार नाही , भारताची वायुदलाची प्रचंड युद्ध वाहू विमाने  हे पाकिस्तान ने ओळखले आहे त्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे घाबरला असून तो देश आता चर्चेची मागणी करत आहे. पण माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या मते पाकिस्तानची हि एक चाल सुधा असू शकते. एका बाजूला चर्चेची मागणी करायची आणि दुसऱ्या बाजूला सीमावर्ती भागामध्ये गोळीबार करायचा. पाकिस्तानच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता सैन्यदलाने आपले काम करावे असेही ते यावेळी म्हणाले.