“चातुर्मास-पर्युषणपर्वच्या” महोत्सवाला पोलीस निरीक्षक मुरलीधर करपेनी भेट

727

भूषण गरुड

पुणे येथील सकल जैन समाजाच्या वतीने बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक केंद्रामध्ये “चातुर्मास महोत्सव-2019” चे आयोजन करण्यात आले. यात ज्येष्ठ जैन मुनींच्या उपस्थितीत संस्कार शिबिर, स्वाध्याय शिबिर आणि बालसंस्कार शिबिर यांसह ध्यान योग साधना, प्रवचन असे कार्यक्रम होत आहेत. हा महोत्सव 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून त्यामध्ये जैन समाजातील सर्वात पवित्रसण सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2019 ते 3 सप्टेंबर 2019 या काळात पर्युषणपर्व उस्तव आहे. मंगळवार पर्युषणपर्व उत्सवाच्या शेवटच्या पर्वाला बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपेनी महोत्सवाला सदिच्छा भेट देत युवाचार्य प.पु.महेंद्रऋषीजी म.सा, प.पु.अक्षयऋषीजी व डॉ.आचलऋषीजी म.सा यांचे आशीर्वाद घेत सर्व सकल जैन समाजाला “पर्युषणपर्व उत्सवाच्या” हार्दिकशुभेच्छा दिल्या. हिंदूंच्या नवरात्रप्रमाणेच हा उत्सव जैन समाज मोठ्या प्रमाणात साजरा करतात.

जैन समाजातील सर्वात पवित्र सण पर्युषण उत्सव सोमवार २६ ऑगस्ट २०१९ रोजी ते ३ सप्टेंबर २०१९ आहे. जैन धर्मीयांच्या श्वेतांबर शाखेचे अनुयायी हा उत्सव साजरा करतात, तर दिगंबर समाजातील जैन धर्मवल्लंबी हा पवित्र उपवास १० दिवस साजरा करतात. पर्युषण हा जैन समाजातील सर्वात मोठा सण मानला जातो, म्हणून त्याला पर्वधिराज देखील म्हणतात. भाद्रपद म्हणजेच भादो महिन्याच्या पाचव्या तारखेला सुरू होणारा हा उत्सव अनंत चतुर्दशीच्या तारखेपर्यंत साजरा केला जातो. जैन धार्मिक लोक धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेया (चोरी करू नका), ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह (जास्त संपत्ती साठवू नका) या पाच तत्त्वांचे पालन करतात. पर्युषणचा सामान्य अर्थ मनातील सर्व विकार कमी करणे होय. म्हणजेच, या उत्सवात आपल्या मनात उद्भवणारे सर्व वाईट विचार दूर करण्याचा उपवास म्हणजे पर्युषण पर्व जैन धार्मिक लोक या उत्सवात मनातील सर्व विकार – क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि वैराग्यपासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. त्याच वेळी, या विकारांवर विजय मिळविल्यानंतर, त्यांना स्वत: ला शांती आणि शुद्धतेकडे नेण्याचा मार्ग सापडतो. हा उत्सव साजरा करणारे अनुयायी भगवान महावीरांनी घालून दिलेल्या १० नियमांचे पालन करून पर्युषण सण साजरे करतात. मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2019 ला “विश्वमित्र दिवस” म्हणून पर्युषणपर्व महोत्सवाच्या समारोपात साजरा केला जातो. शेवटच्या दिवशी दिगंबर “उत्तम क्षमा” आणि श्वेतांबरा “मिच्छमी दुक्कडम” मनात लोकांकडून क्षमा मागतात.

“चातुर्मास व पर्युषणपर्व” उत्सवाच्यावेळी,
बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, लखीचंद खिवसरा, पृथ्वीराजजी धोका, प्रवीणजी चोरडिया, रायचंद खिवसरा, संतोष पारख, गिरीश मावडीकर, अन्नछत्रांमध्ये जेवणाची व्यवस्था सांभाळणारे बाबू महाराज, मोठ्या संख्येने सकल जैन जनसमुदाय उपस्थित होता.