इंद्रायणीकाठी गीताभक्ति अमृत महोत्सवासाठी संतांची मांदियाळी

123

पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांचा जन्मोत्सव; पूज्य स्वामी राजेंद्रदासजी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने अनुष्ठानाने


आळंदी  प्रतिनिधी,

: श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांच्या ७५ व्या जन्मसोहळ्या निमित्ताने आळंदी नगरी सज्ज झाली आहे. मलुक पीठ, वृंदावनचे संत राजेंद्रदास महाराज यांचे उपस्थितीत धार्मिक अनुष्ठान करण्यात आले. यावेळी देशभरातील साधुसंतांच्या उपस्थितीने आळंदीतील प्रशस्त जागेत संतांचा मेळा भरला. तशी काहींना अनुभूती आली. सुमारे पंधरा हजारांहून अधिक भाविकांच्या हजेरीत ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर झालेल्या वारकरी सन्मान सोहळ्याने गीताभक्ति अमृत महोत्सवात संतांची मांदियाळी जमली होती. यावेळी पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळ्या निमित्त पूज्य स्वामी राजेंद्रदासजी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने अनुष्ठान झाले.त्यानंतर झालेल्या वारकरी सन्मान सोहळा झाला. गीताभक्ति अमृत महोत्सव ११ फेब्रुवारी पर्यंत हरिनाम गजरात होत आहे.
आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण धर्मरक्षा आणि राष्ट्र निर्माणा साठी समर्पित करणारे पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज स्वामी संत परंपरेचे प्रचारक आहेत. दरवर्षी पूज्य स्वामीजींचा जन्मदिवस गीताभक्ति दिवस म्हणून साजरा करीत असतो. मात्र यावर्षी स्वामीजींच्या दिव्य जीवनाची ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने संलग्न संस्थांनी ‘गीताभक्ति अमृत महोत्सवा’चे आयोजन केले आहे. रविवारी ( दि. ४ ) ष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर वारकरी सत्कार, यज्ञ विधी सुरु झाला. कल्याण महाराज, संदीपन महाराज शिंदे, भास्करगिरि महाराज यांची श्रुश्राव्य किर्तने झाली.
आळंदीत सुरु झालेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवास सुमारे ७० हजार चौरस फुटांचा भव्य मांडव टाकण्यात आला. कार्यक्रम पाहण्याची व्य्वस्था केली आहे. मात्र येथील वारकरी साधक यांचे भोजनाची व्यवस्था नसल्याने साधकांची गैरसोय झाली. अध्यात्म, संस्कृती आणि उत्सव यांचा अनोखा भक्तीपूर्ण संगम आळंदीत साजरा होत आहे सोहळ्यासाठी पुढील आठ दिवस देशभरातील साधुसंतांसह राजकीय नेते येथे हजेरी लावणार आहे. वाढदिवस हे केवळ निमित्त आहे, या निमित्ताने ज्ञानोबा-तुकारामांच्या विचार देशभरात पोहोचेल. विश्व कल्याणाचा व समन्वयाचा, शांती आणि प्रेमाचा संदेश आपल्या सर्व संतानी दिला. महाराष्ट्राचे संत शिरोमणी ज्ञानदेवांच्या भूमित हा कार्यक्रम होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
यासाठी गीता परिवार, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, श्रीकृष्ण सेवानिधी व संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल या संस्थानी गीताभक्ति अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन करुन भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अनोखा मेळ घातल्याचेही स्वामीजींनी यावेळी सांगितले. आजच्या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायासह पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांना मानणारे हजारो भाविक उपस्थित होते. झालेला गीताभक्ति अमृत महोत्सव ११ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.