हिंदी दिवस निमित्त पुण्यात अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजn

216

प्रतिभा चौधरी,पुणे 

सन 2019 मध्ये, गृहमंत्र्यांनी हिंदी दिवस सोहळ्याचे दिल्लीबाहेर मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि गेल्या 2 वर्षांपासून, राजभाषा विभाग, गृह मंत्रालय हे काम अतिशय यशस्वीपणे करत आहे.

13-14 नोव्हेंबर 2021 रोजी वाराणसी येथे पहिली अखिल भारतीय राजभाषा परिषद आयोजित करण्यात आली होती. या दोन दिवसीय परिषदेत, माननीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्र सरकार/उपक्रम/बँकांचे हिंदी अधिकारी, हिंदी प्रेमी आणि अनेक भारतीय भाषांचे अभ्यासक सहभागी झाले होते.

 

त्यानंतर, ही मालिका सुरू ठेवत विभागाने गुजरातमधील सुरत शहरात हिंदी दिवस 2022 आणि दुसरी अखिल भारतीय राजभाषा परिषद आयोजित करण्यात आली.  या भव्य कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले 10,000 हून अधिक अभ्यागत उपस्थित होते. राजभाषा विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय परिषदेच्या माध्यमातून हिंदी भाषेच्या बाजूने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. हिंदी भाषा आणि सर्व प्रादेशिक भाषांना माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांचे एकाच वेळी संवर्धन, सौहार्द, सहिष्णुता आणि सहकार्याने देशाची भाषिक एकता आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यास बळ मिळत आहे.

राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने 14-15 सप्टेंबर, 2023 रोजी पुण्याच्या पवित्र भूमीवर शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी येथे हिंदी दिवस आणि तिसरे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित, ही अत्यंत उत्साहाची आणि आनंदाची बाब आहे.  या दोन दिवसीय कार्यक्रमात, उद्घाटन सत्राव्यतिरिक्त, अधिकृत भाषा @2047: विकसित भारताचे भाषिक परिदृश्य (कृत्रिम बुद्धिमत्तेसह) आणि हिंदी भारतीय भाषांपेक्षा मजबूत होत आहे, अशा प्रकारची विविध विषयांवर  केंद्रित  सत्रे असतील.  देशभरातील विविध मंत्रालये/विभाग/कार्यालये यांना राजभाषा लागू करण्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विविध मान्यवरांच्या हस्ते राजभाषा कीर्ती आणि राजभाषा  गौरव पुरस्कार दिले जातील.

आज संपूर्ण जग एका परिवर्तनामधून वाटचाल करत आहे ज्यामध्ये डिजिटल क्रांतीची भूमिका  महत्त्वाची आहे. गृह मंत्रालयाचा राजभाषा विभाग राजभाषा हिंदीच्या वापरामध्ये सक्षम तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. विभागाने राजभाषा हिंदीच्या वापराला माहिती तंत्रज्ञानाच्या  माध्यमातून सोपे बनवण्याच्या दिशेने काम करत स्मृती आधारित अनुवाद प्रणाली ‘कंठस्थ’(https://kanthasth-rajbhasha.gov.in)  ची निर्मिती आणि विकास केला आहे जिचा वापर सुनिश्चित करून सरकारी कार्यालयांमध्ये अनुवादाचा वेग आणि गुणवत्ता वाढवण्यात आली आहे.  याची नवी आवृत्ती न्यूरल मशीन ट्रान्स्लेशनबरोबरच अनेक नव्या वैशिष्ट्यांची भर घालण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात, या अनुवाद साधनामध्ये समाविष्ट झालेल्या वाक्यांची संख्या 50 लाखांहून अधिक झाली आहे. उद्घाटन सत्रात कंठस्थ आणि ई-ऑफिसचे   एकात्मीकरण  करण्यात येणार आहे. यामुळे  ई-ऑफिस वापरकर्त्यांना इतर कोणत्याही मंचावर  न जाता भाषांतराची सुविधा प्राप्त होईल.

हिंदीला तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या संदर्भात, राजभाषा विभागाचा एक नवीन उपक्रम म्हणजे  ‘हिंदी शब्द सिंधु’(https://hindishabdsindhu.rajbhasha.gov.in/).  याच्या  पहिल्या आवृत्तीचे लोकार्पण गृहमंत्र्यांच्या हस्ते  सुरतच्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात झाले होते.  यात  मोठ्या प्रमाणात शब्दांचा समावेश करण्यात आला असून विभागाकडून ते सातत्याने अद्ययावत करून नवीन शब्दांचा समावेश करून समृद्ध केले जात आहे. अमृत महोत्सवाचे औचित्य साधत  प्रसिद्ध करण्यात आलेल्या  या शब्दकोशात  कायदा, तंत्रज्ञान, आरोग्य, पत्रकारिता आणि उद्योग  इत्यादी क्षेत्रातल्या  तसेच विविध भारतीय भाषांमधील लोकप्रिय शब्दांचा समावेश असून   सुलभ  संदर्भासाठी चांगला शब्दकोश म्हणून तो उपयुक्त ठरेल.निश्चितच  प्रशिक्षण, भाषांतर आणि भाषा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून अशा प्रगत संज्ञा  महत्त्वाच्या ठरतील. व्यासपीठावर उपस्थित अतिथींच्या हस्ते  14   तारखेला   ‘हिंदी शब्द सिंधु’ च्या दुसऱ्या आवृत्तीचे  प्रकाशन होईल. विभागाने लोकांसाठी  लीला हिंदी प्रवाह मोबाईल अॅप देखील तयार केले असून त्याचा उपयोग  करून विभिन्न भाषा बोलणारे लोक  14 भारतीय भाषांच्या माध्यमातून आपापल्या  मातृभाषेतून  विनामूल्य  हिंदी शिकू शकतात. त्याचप्रमाणे राजभाषा विभागाचा प्रकल्प  ‘ई-महाशब्दकोश’ आणि  ‘ई-सरल’ हिंदी वाक्यकोश  विभागाच्या संकेतस्थळावर  उपलब्ध आहेत.

आपल्या सर्वांच्या माहितीसाठी, मी हे देखील सांगू इच्छिते  की राजभाषेच्या उपयोगाला अधिक गती देण्यासाठी , मे 2019 मध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, आतापर्यंत  सर्व 59 मंत्रालयांमध्ये हिंदी सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत आणि या सल्लागार समितीच्या बैठकाही सातत्याने आयोजित केल्या जात आहेत. देशभरातील विविध शहरांमध्ये राजभाषेचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने एकूण  528  नगर  राजभाषा कार्यान्वयन  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. परदेशातही लंडन, सिंगापूर, फिजी, दुबई आणि पोर्ट लुई येथे नगर  राजभाषा कार्यान्वयन  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत जेणेकरून या शहरांमध्ये असलेल्या भारत सरकारच्या कार्यालयांमध्ये राजभाषा हिंदीचा  प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकेल.

पुणे येथे आयोजित होणाऱ्या संमेलनात आपल्या  सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.

धन्यवाद !