अनिल चौधरी , पुणे
पुणे शहर तसेच जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शासनाने रिंग रोडचा प्रस्ताव आणला असून प्रत्यक्षात जमिनीची मोजणी आणि जमीन ताब्यात घेण्याचे काम शासनाने सुरु केले आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याच्या बागायती जमिनी जात असून त्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला प्रचलित नवीन कायद्यानुसार दिला जात आहे. पडजमीनीसाठी शासनाने एक ठराविक रक्कम ठरविली असून बागायतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मोबदला शेतकऱ्याना मिळत आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे घरातील वडीलधारी लोकांची नावे जमिनीच्या सातबारा मध्ये लागत असत .
चिंबळी गावातील प्रगतिशील शेतकरी श्री नवनाथ बनकर व त्यांचे दोन चुलते यांची वडिलोप्रर्जित जमीन ४० वर्षांपूर्वी भाऊ हिश्याप्रमाणे वाटून मिळावी आहे. त्यांनी सुरुवातीला मिळालेल्या जागेत खूपच दगड गोटे , बाभळी, तसेच राडा रोडा होता. त्यांनी व त्यांच्या मुलांनी अहोरात्र कष्ट करून जमीन साफ करून या ठिकाणी प्रथम बाजरी , भूहीमूग , हरबरा तसेच तत्सम पिके घेतली. यानंतर त्यांचे चुलते यांनी मार्गदर्शन करून जुन्या दिवाणी न्यायालयलीन दावा असल्याने या ठिकाणी शंबर टक्के वहिवाट दाखवावी लागेल. त्यांमुळे २०१२ मध्ये त्यांनी या जमिनीत आंब्यांची फळबागा करावी लागेल असा सल्ला दिला . यामुळे याठिकाणी या बनकर कुटुंबाने अतिशय मेहनत घेऊन अगदी लहान मुलांप्रमाणे आंब्यांची , चिकूची, डाळींबाची , शेवगा, कडीपत्ता आणि नारळाची झाडे लावून उत्पनाचा स्रोत निंर्माण केला.
यानंतर याठिकाणी रिंगरोडचे आरक्षण पडले व सरकारने या जमिनीची मोजणी करून मोबदला देण्याचे काम सुरु केले. परंतु यांचे चुलते यांनी उशिरा फळबाग लावल्याने त्यांना सरकारने कमी मोबदला दिला. त्यांचे काही नातेवाईक काही हिस्सा नसताना देखील ते जमिनीचा मोबदला मागत आहे. नवनाथ बनकर आणि त्यांचे दोन चुलते यांच्या मालकीच्या बागायती शेतामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची झाडे असल्याने त्यांना शासनाने मोठ्या प्रमाणावर मोबदला दिला. यामुळे कुटुंबातील इतर सदस्य नाराज होऊन त्यांनी अवाच्या सव्वा रकमेची मागणी सुरु केली.
तर नवनाथ बनकर यांची वडिलोपर्जित जमीन असल्याने त्यांच्या सातबारा उताऱ्यात असणाऱ्या इतर कुटुंबातील सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर रकमेची मागणी केल्याने ते अस्वस्थ झाले आहेत यामुळे कुटुंबात वाद निर्माण झाला आहे. तर नवनाथ बनकर यांनी मी माझे दोन चुलते व मुलांनी मोठे कबाड कष्ट करून दिवस रात्र घाम गाळून पडीक जमिनीचे नंदनवन केले व बागायती जमिनीचे सोने केले. यामुळे माझे असे म्हणणे आहे कि , सरकारने जो काही फळझाडांची मोबदला दिला आहे तो आम्ही कुटुंबातील इतर कोणालाही देणार नाही मात्र वडिलोपर्जित जमिनीत आपण हिस्सा देण्यास तयार आहोत . तरी कुटुंबातील इतर सदस्यांनी याची नोंद घेऊन जमिनीचा मोबदला घ्यावा असे विचार त्यांनी मांडले. आमच्या जमिनीत ते हिस्सा मागत असल्याने त्यांच्याही जमिनीत आम्हाला हिस्सा मिळावा हि सरकारकडे आमची रास्त मागणी आहे असे ते म्हणाले.
वास्तविक हि समस्यां महाराष्ट्रात गंभीर स्वरूप घेत आहे. यामुळे बऱ्याचदा भाऊबंदकीमध्ये तणाव निर्माण होत असून काही वेळेस खून सुद्धा झालेले आपण पहात आहे. यामुळे कुटुंबातील नातेसंबंध दुरावताना दिसत आहेत. वेळीच लोकांनी संपत्तीचा व पैशांचा लोभ न धरता ज्याला ज्या हिश्यात जे पैसे मिळाले ते मिळू द्यावेत. अशाच बऱ्याच प्रकरणांमध्ये सरकारी मोबदला मिळालेले पैसे वर्षानुवर्षे सरकारी दप्तरी धूळ खात पडलेले दिसतात. यामुळे नागरिकांनी वेळीच दक्षाता घेऊन समाजात सह्चार्याचे वातारण ठेवावे,